🟢 वेदोक्त प्रकरण 🟢
🔺छत्रपती शाहू महाराज. 🔺
◾️कोल्हापुरात वेदोक्त प्रकरणाचा स्फोट झाला (1899)
◾️कोल्हापुरातील ब्राह्मणवर्गाने शाहू महाराजांचे क्षत्रियत्व नाकारून त्यांना शूद्र म्हटले आणि त्यांना वेदमंत्राचा अधिकार नाकारला. यातून वेदोक्ताच्या संघर्षाचे पडसाद सर्व महाराष्ट्रभर उमटले.
◾️टिळकांनी ब्राह्मणवर्गाची बाजू घेतल्याने प्रकरण इरेस पडले.
◾️शाहू महाराजांनी वेदोक्ताचा अधिकार नाकारणाऱ्या राजोपाध्यांची व शंकराचार्यांची वतने जप्त केली.
◾️ब्रह्मवर्गाने हे प्रकरण व्हाइसरॉयपर्यंत नेले; पण शेवटी शाहू महाराजांची सरशी झाली.
◾️कोल्हापुरातील ब्रह्मवर्गास त्यांच्याशी समेट करावा लागला, पण महाराष्ट्रातील ब्रह्मवर्ग शेवटपर्यंत त्यांच्या विरोधातच राहिला.
◾️कुलकर्णी-वतन बरखास्ती, सत्यशोधक जलशांना शाहू महाराजांचा पाठिंबा या बाबींमुळे तर हा विरोध वाढतच गेला.
◾️वेदोक्त प्रकरणातील अनुभवावरून, भिक्षुकशाहीच्या जाळ्यातून मुक्त झाल्याशिवाय उच्चवर्णियांची धार्मिक व सामाजिक मक्तेदारी नष्ट होणार नाही, अशी शाहूंची धारणा झाली होती. परिणामी ते म. फुल्यांच्या सत्यशोधक विचारसरणीकडे आकृष्ट झाले.
◾️ त्यांनी उघडपणे त्यांचे अनुयायीत्व स्वीकारले नसले, तरी सत्यशोधक तत्त्वांना त्यांचा पाठिंबा होता.
◾️त्यांच्या प्रोत्साहनामुळे महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन झाले. पारंपरिक भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी त्यांनी कोल्हापुरात ब्राह्मणेतर पुरोहितांची निर्मिती करण्यासाठी ‘श्री शिवाजी वैदिक स्कूल' ची स्थापना केली
◾️ मराठ्यांसाठी स्वतंत्र ‘क्षात्रजगद्गुरू' पद निर्माण करून त्यावर सदाशिवराव पाटील या उच्चविद्याविभूषित तरुणास नेमले (1920).
◾️धार्मिक व सामाजिक क्षेत्रांत हा एक अभिनव प्रयोग होता.
माहिती संकलन:- सचिन गुळीग
History4all By Sachin Gulig
🔺छत्रपती शाहू महाराज. 🔺
◾️कोल्हापुरात वेदोक्त प्रकरणाचा स्फोट झाला (1899)
◾️कोल्हापुरातील ब्राह्मणवर्गाने शाहू महाराजांचे क्षत्रियत्व नाकारून त्यांना शूद्र म्हटले आणि त्यांना वेदमंत्राचा अधिकार नाकारला. यातून वेदोक्ताच्या संघर्षाचे पडसाद सर्व महाराष्ट्रभर उमटले.
◾️टिळकांनी ब्राह्मणवर्गाची बाजू घेतल्याने प्रकरण इरेस पडले.
◾️शाहू महाराजांनी वेदोक्ताचा अधिकार नाकारणाऱ्या राजोपाध्यांची व शंकराचार्यांची वतने जप्त केली.
◾️ब्रह्मवर्गाने हे प्रकरण व्हाइसरॉयपर्यंत नेले; पण शेवटी शाहू महाराजांची सरशी झाली.
◾️कोल्हापुरातील ब्रह्मवर्गास त्यांच्याशी समेट करावा लागला, पण महाराष्ट्रातील ब्रह्मवर्ग शेवटपर्यंत त्यांच्या विरोधातच राहिला.
◾️कुलकर्णी-वतन बरखास्ती, सत्यशोधक जलशांना शाहू महाराजांचा पाठिंबा या बाबींमुळे तर हा विरोध वाढतच गेला.
◾️वेदोक्त प्रकरणातील अनुभवावरून, भिक्षुकशाहीच्या जाळ्यातून मुक्त झाल्याशिवाय उच्चवर्णियांची धार्मिक व सामाजिक मक्तेदारी नष्ट होणार नाही, अशी शाहूंची धारणा झाली होती. परिणामी ते म. फुल्यांच्या सत्यशोधक विचारसरणीकडे आकृष्ट झाले.
◾️ त्यांनी उघडपणे त्यांचे अनुयायीत्व स्वीकारले नसले, तरी सत्यशोधक तत्त्वांना त्यांचा पाठिंबा होता.
◾️त्यांच्या प्रोत्साहनामुळे महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन झाले. पारंपरिक भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी त्यांनी कोल्हापुरात ब्राह्मणेतर पुरोहितांची निर्मिती करण्यासाठी ‘श्री शिवाजी वैदिक स्कूल' ची स्थापना केली
◾️ मराठ्यांसाठी स्वतंत्र ‘क्षात्रजगद्गुरू' पद निर्माण करून त्यावर सदाशिवराव पाटील या उच्चविद्याविभूषित तरुणास नेमले (1920).
◾️धार्मिक व सामाजिक क्षेत्रांत हा एक अभिनव प्रयोग होता.
माहिती संकलन:- सचिन गुळीग
History4all By Sachin Gulig