चर्चित व्यक्ती :-
अनिल धस्माना :-
....................................................................
• रिसर्च अँड अॅ्नलिसिस विंग म्हणजेच ‘रॉ’ चे माजी प्रमुख अनिल धस्माना यांची नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
• उपग्रह फोटो आणि टेक्निकल इंटेलिजन्सची जबाबदारी NTRO वर आहे.
• धस्माना आयबीचे माजी अधिकारी सतीश झा यांची जागा घेतील. अनिल धस्माना १९८१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते पाकिस्तानच्या विषयातील तज्ज्ञ असून मागच्यावर्षी पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला होता. त्याच्या आखणीमध्ये धस्माना यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. धस्माना पुढची दोनवर्ष NTRO च्या प्रमुखपदी असणार आहेत.
• पूर्व लडाख सीमेवर चीन बरोबर संघर्षाची स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर अनिल धस्माना यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी आहे. लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चीन बरोबर अनेक ठिकाणी संघर्षाची स्थिती आहे. तिथे चीनच्या सर्व सैन्य हालचालींची माहिती ठेवण्यात NTRO महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मध्य प्रदेश केडरचे आयपीएस अधिकारी असणारे अनिल धस्माना यांनी १९९३ साली ‘रॉ’ मध्ये काम सुरु केले. ‘रॉ’ कडे भारताच्या बाह्य सुरक्षेची जबाबदारी आहे.
अनिल धस्माना :-
....................................................................
• रिसर्च अँड अॅ्नलिसिस विंग म्हणजेच ‘रॉ’ चे माजी प्रमुख अनिल धस्माना यांची नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
• उपग्रह फोटो आणि टेक्निकल इंटेलिजन्सची जबाबदारी NTRO वर आहे.
• धस्माना आयबीचे माजी अधिकारी सतीश झा यांची जागा घेतील. अनिल धस्माना १९८१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते पाकिस्तानच्या विषयातील तज्ज्ञ असून मागच्यावर्षी पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला होता. त्याच्या आखणीमध्ये धस्माना यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. धस्माना पुढची दोनवर्ष NTRO च्या प्रमुखपदी असणार आहेत.
• पूर्व लडाख सीमेवर चीन बरोबर संघर्षाची स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर अनिल धस्माना यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी आहे. लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चीन बरोबर अनेक ठिकाणी संघर्षाची स्थिती आहे. तिथे चीनच्या सर्व सैन्य हालचालींची माहिती ठेवण्यात NTRO महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मध्य प्रदेश केडरचे आयपीएस अधिकारी असणारे अनिल धस्माना यांनी १९९३ साली ‘रॉ’ मध्ये काम सुरु केले. ‘रॉ’ कडे भारताच्या बाह्य सुरक्षेची जबाबदारी आहे.