पहिल्यांदाच मुख्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी........
१) अभ्यासक्रम व बेसिक पुस्तके आधी वाचून काढा.
२) अभ्यासक्रमाच्या दोन प्रती आपल्याला रोज दिसतील अशा ठिकाणी लावा.
३) पहिल्या प्रतीवर नेहमी वाचल्या जाणाऱ्या उत्तम संदर्भ पुस्तकांची नावे उपघटकांसमोर लिहा.
४) दुसऱ्या प्रतीवर जे घटक वाचून झाले आहेत त्यांना हायलाईट करा व रिव्हिजनसाठी वापरल्या जाणाऱ्या पुस्तकाचे नाव लिहून ठेवा.
५) रोज मिळत असलेल्या तासांचे नियोजन करत वेळापत्रक आखा व ते कठोरपणे पाळा.
६) नवीन पुस्तकांना शेवटच्या टप्प्यातच पहा तोपर्यंत ते पुस्तक कसे आहे यावर इतरांकडून माहिती मिळालेली असेल.
७) आयोगाने पूर्व परीक्षेत मागील २/३ वर्षांचे प्रश्न विचारुन एक झटका दिला आहे. त्यामुळे चालू घडामोडी GSसोबत लिंक करुन अभ्यास करा.
८) प्रश्नपत्रिका सोडविण्याची घाई करु नका. उपघटक वाचून झाल्यानंतरच त्यावरील प्रश्न सोडवा. जेणेकरून एक रिव्हिजन होईल.
९) आपल्या मनात कोणत्याही शंकाना जागा देऊ नका. काहीही असेल तर त्यांचे निरसन करुन घ्या.
१०) शेवटी अभ्यास तुम्हीच करणार आहात. तेव्हा तुम्हांला जे जमेल, जे शक्य होईल तेच करा. ऐकावे जनाचे करावे मनाचे!
अभ्यासक्रम भिंतीवर लावण्यास का सांगितला जातो?
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, "तुमच्यासमोर उद्दिष्ट काय आहे ते नीट समजून घ्या. शासनकर्ते बनणे हेच आमचे उद्दिष्ट व आकांक्षा आहे, हे तुमच्या मनात ठसू द्या. तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा. म्हणजे दररोज तुम्हाला आठवण राहील की, ज्या आकांक्षा आपण उराशी बाळगून आहोत, ज्याच्यासाठी आम्ही लढत आहोत ते काही लहानसहान संकुचित ध्येय नाही. थोड्याशा नोकऱ्यांसाठी किंवा सवलतींसाठी आपला लढा नाही. अंत:करणातील आकांक्षा फारच मोठ्या आहेत. शासनकर्ते बनणे हीच ती आकांक्षा होय."
२४ सप्टेंबर १९४४ रोजी तत्कालीन मद्रासच्या (आताचे चेन्नई) पार्क टाऊनमध्ये जाहीर सभेतील भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे विचार व्यक्त केले होते.
'घरातल्या भिंतीवर' जे वाक्य लिहले जाते ते दिवसरात्र आपल्या नजरे समोर असते. त्यामुळे त्याचे दृढीकरण होते, व जीवनाचा तो एक भाग होतो. त्याच बरोबर त्यांनी 'शासनकर्ते असा शब्द वापरला, राजकारणी नाही. शासन ही बहुआयामी संकल्पना आहे.
शासन म्हणजे केवळ राजकारण नाही, तर शासनात लोकशाहीचे सर्व स्तंभ येतात. न्यायव्यवस्था, प्रशासन, प्रसारमाध्यमे, संसद, कायदे मंडळ या सर्वांवर आपला प्रभाव असायला हवा. तरच आपण शासनकर्ते होऊ शकतो.
दीपक गायकवाड
- आदित्य अकॅडमी
- अखंड महाराष्ट्र विद्यार्थी चळवळ
- बोधिवृक्ष फाऊंडेशन
१) अभ्यासक्रम व बेसिक पुस्तके आधी वाचून काढा.
२) अभ्यासक्रमाच्या दोन प्रती आपल्याला रोज दिसतील अशा ठिकाणी लावा.
३) पहिल्या प्रतीवर नेहमी वाचल्या जाणाऱ्या उत्तम संदर्भ पुस्तकांची नावे उपघटकांसमोर लिहा.
४) दुसऱ्या प्रतीवर जे घटक वाचून झाले आहेत त्यांना हायलाईट करा व रिव्हिजनसाठी वापरल्या जाणाऱ्या पुस्तकाचे नाव लिहून ठेवा.
५) रोज मिळत असलेल्या तासांचे नियोजन करत वेळापत्रक आखा व ते कठोरपणे पाळा.
६) नवीन पुस्तकांना शेवटच्या टप्प्यातच पहा तोपर्यंत ते पुस्तक कसे आहे यावर इतरांकडून माहिती मिळालेली असेल.
७) आयोगाने पूर्व परीक्षेत मागील २/३ वर्षांचे प्रश्न विचारुन एक झटका दिला आहे. त्यामुळे चालू घडामोडी GSसोबत लिंक करुन अभ्यास करा.
८) प्रश्नपत्रिका सोडविण्याची घाई करु नका. उपघटक वाचून झाल्यानंतरच त्यावरील प्रश्न सोडवा. जेणेकरून एक रिव्हिजन होईल.
९) आपल्या मनात कोणत्याही शंकाना जागा देऊ नका. काहीही असेल तर त्यांचे निरसन करुन घ्या.
१०) शेवटी अभ्यास तुम्हीच करणार आहात. तेव्हा तुम्हांला जे जमेल, जे शक्य होईल तेच करा. ऐकावे जनाचे करावे मनाचे!
अभ्यासक्रम भिंतीवर लावण्यास का सांगितला जातो?
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, "तुमच्यासमोर उद्दिष्ट काय आहे ते नीट समजून घ्या. शासनकर्ते बनणे हेच आमचे उद्दिष्ट व आकांक्षा आहे, हे तुमच्या मनात ठसू द्या. तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा. म्हणजे दररोज तुम्हाला आठवण राहील की, ज्या आकांक्षा आपण उराशी बाळगून आहोत, ज्याच्यासाठी आम्ही लढत आहोत ते काही लहानसहान संकुचित ध्येय नाही. थोड्याशा नोकऱ्यांसाठी किंवा सवलतींसाठी आपला लढा नाही. अंत:करणातील आकांक्षा फारच मोठ्या आहेत. शासनकर्ते बनणे हीच ती आकांक्षा होय."
२४ सप्टेंबर १९४४ रोजी तत्कालीन मद्रासच्या (आताचे चेन्नई) पार्क टाऊनमध्ये जाहीर सभेतील भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे विचार व्यक्त केले होते.
'घरातल्या भिंतीवर' जे वाक्य लिहले जाते ते दिवसरात्र आपल्या नजरे समोर असते. त्यामुळे त्याचे दृढीकरण होते, व जीवनाचा तो एक भाग होतो. त्याच बरोबर त्यांनी 'शासनकर्ते असा शब्द वापरला, राजकारणी नाही. शासन ही बहुआयामी संकल्पना आहे.
शासन म्हणजे केवळ राजकारण नाही, तर शासनात लोकशाहीचे सर्व स्तंभ येतात. न्यायव्यवस्था, प्रशासन, प्रसारमाध्यमे, संसद, कायदे मंडळ या सर्वांवर आपला प्रभाव असायला हवा. तरच आपण शासनकर्ते होऊ शकतो.
दीपक गायकवाड
- आदित्य अकॅडमी
- अखंड महाराष्ट्र विद्यार्थी चळवळ
- बोधिवृक्ष फाऊंडेशन