Репост из: 🔰 Current Affairs Marathi 🔰
🔷महामार्गावर मनुष्य आणि प्राण्यांचे मृत्यू रोखण्यासंदर्भातल्या राष्ट्रीय जागृती अभियानाचा प्रारंभ
- जैव साखळी आणि शाश्वतता मानवी आयुष्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत. रस्त्यावरचे मृत्यू रोखण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या आणि शिक्षणाच्या गरज लक्षात घेता, दिनांक 5 जून 2020 रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते “महामार्गावर मनुष्य आणि प्राण्यांचे मृत्यू रोखणे” याच्या संदर्भातल्या राष्ट्रीय जागृती अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.
▪️ठळक बाबी
- संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) आणि भारत सरकारचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय यांचा हा संयुक्त कार्यक्रम आहे.
- भारतात वर्षाला सुमारे पाच लक्ष रस्ते अपघात होतात. त्यामध्ये 1.5 लक्ष मृत्यू होतात. येत्या 31 मार्चपर्यंत हे प्रमाण 20 ते 25 टक्क्यांनी कमी करण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून केला जाणार आहे.
- सुमारे पाच हजार अपघातप्रवण ठिकाणे ओळखून त्या ठिकाणी तातडीने तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. या अपघातप्रवण भागांसाठी अल्प आणि दीर्घ कालीन कायमस्वरूपी उपाययोजनासाठी मानक संचालन पद्धती आधीच प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत नव्याने निश्चित केलेल्या 1739 अपघातप्रवण ठिकाणी तात्पुरत्या तर नव्याने निश्चित केलेल्या अशा 840 ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात आहे.
- राष्ट्रीय महामार्गावर अपघात प्रवण क्षेत्रांसाठी रस्ते सुरक्षा उपाय अधोरेखित करण्यात आले असून, मोडकळीला आलेल्या आणि अरुंद पुलांची पुनर्बांधणी, दुरुस्ती, रस्ते सुरक्षा तपासणी, असुरक्षित रस्त्यावरचे अपघाती मृत्यू कमी करणे, महामार्ग गस्त आणि बांधकामा दरम्यानची सुरक्षा यांचा यात समावेश आहे.
- रस्ते बांधकाम तसेच विद्युत, दूरसंवाद यासह इतर पायाभूत वाहिन्यांसाठी काम करताना वन्यजीवांची हानी होऊ नये याची काळजी घेण्यासाठी देहरादून इथल्या भारतीय वन्यजीव संस्थेने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या पर्यावरण स्नेही उपायांचा अवलंब करण्याच्या सूचना सर्व संस्थांना करण्यात आल्या आहेत.
---------------------------------------------------
जॉईन करा.@chaluGhadamodi
- जैव साखळी आणि शाश्वतता मानवी आयुष्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत. रस्त्यावरचे मृत्यू रोखण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या आणि शिक्षणाच्या गरज लक्षात घेता, दिनांक 5 जून 2020 रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते “महामार्गावर मनुष्य आणि प्राण्यांचे मृत्यू रोखणे” याच्या संदर्भातल्या राष्ट्रीय जागृती अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.
▪️ठळक बाबी
- संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) आणि भारत सरकारचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय यांचा हा संयुक्त कार्यक्रम आहे.
- भारतात वर्षाला सुमारे पाच लक्ष रस्ते अपघात होतात. त्यामध्ये 1.5 लक्ष मृत्यू होतात. येत्या 31 मार्चपर्यंत हे प्रमाण 20 ते 25 टक्क्यांनी कमी करण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून केला जाणार आहे.
- सुमारे पाच हजार अपघातप्रवण ठिकाणे ओळखून त्या ठिकाणी तातडीने तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. या अपघातप्रवण भागांसाठी अल्प आणि दीर्घ कालीन कायमस्वरूपी उपाययोजनासाठी मानक संचालन पद्धती आधीच प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत नव्याने निश्चित केलेल्या 1739 अपघातप्रवण ठिकाणी तात्पुरत्या तर नव्याने निश्चित केलेल्या अशा 840 ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात आहे.
- राष्ट्रीय महामार्गावर अपघात प्रवण क्षेत्रांसाठी रस्ते सुरक्षा उपाय अधोरेखित करण्यात आले असून, मोडकळीला आलेल्या आणि अरुंद पुलांची पुनर्बांधणी, दुरुस्ती, रस्ते सुरक्षा तपासणी, असुरक्षित रस्त्यावरचे अपघाती मृत्यू कमी करणे, महामार्ग गस्त आणि बांधकामा दरम्यानची सुरक्षा यांचा यात समावेश आहे.
- रस्ते बांधकाम तसेच विद्युत, दूरसंवाद यासह इतर पायाभूत वाहिन्यांसाठी काम करताना वन्यजीवांची हानी होऊ नये याची काळजी घेण्यासाठी देहरादून इथल्या भारतीय वन्यजीव संस्थेने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या पर्यावरण स्नेही उपायांचा अवलंब करण्याच्या सूचना सर्व संस्थांना करण्यात आल्या आहेत.
---------------------------------------------------
जॉईन करा.@chaluGhadamodi