Репост из: MPSC मित्र
🎇 निजामाच्या खजिन्यावर भारताचा हक्क; लंडनमधील ७० वर्षांपासूनचा खटला निकाली 🎇
◾️ ‘हैदराबाद फंड’ प्रकरण या नावाने लंडनच्या न्यायालयात प्रसिद्ध असलेल्या या वादग्रस्त खटल्याचा निकाल गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात भारताच्या बाजूने लागला होता.
◾️यामुळे बँकेत अडकलेले ३२४ कोटी रुपये ब्रिटनमधील भारताच्या उच्चायुक्तांकडे जमा करण्यात आले आहेत.
◾️तत्कालीन हैदराबाद संस्थानच्या निजामाच्या संपत्तीचा भारत व पाकिस्तानमध्ये गेल्या सात दशकांपासून सुरू होता.
◾️त्यानुसार ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयाकडे ३२४ कोटी रुपये गुरुवारी (ता. १३) जमा करण्यात आले आहेत.
◾️ लंडनमधील ‘नेटवेस्ट’ बँकेत २० सप्टेंबर १९४८ पासून हे पैसे पडून होते. या संपत्तीवर पाकिस्ताने केलेला दावा न्यायालयाने फेटाळून तर लावलाच शिवाय न्यायालयीन खर्चाचा ६५ टक्के वाटा भारताला देण्याचा आदेश दिला होता.
◾️. फाळणीनंतर निजाम मीर उस्मान अली खान यांचे अर्थमंत्री मोईन नवाज जंग यांनी १९४८ मध्ये जवळपास ८ कोटी ८७ लाख रुपये एवढी रक्कम पाकिस्तानचे लंडनमधील तत्कालीन उच्चायुक्त एच. आय. रहीमतुला यांच्या नावे लंडनमधील ‘नॅशनल वेस्टमिन्स्टर बँके’त हस्तांतर केली होती.
◾️ही रक्कम आता ३२४ कोटी रुपये झाली आहे. तसेच ही बँकही ‘रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड’ या नावाने परिचित आहे.
◾️ पैशाच्या या व्यवहाराबाबत निजामाला अंधारात ठेवण्यात आले होते.
◾️उस्मान अली खान हे त्यावेळचे जगातील सर्वांत श्रीमंती व्यक्ती होते. त्यांचे निधन १९६७ मध्ये झाले.
◾️त्यांचे वंशज व आठवे निजाम मुकर्रम जहाँ आणि त्यांचे कनिष्ठ बंधू मुफ्फखम जहाँ हे पाकिस्तानच्या विरोधात हा खटला लढत होते.
◾️ लंडन न्यायालयाचे न्यायाधीश मार्कस स्मिथ यांनी निजाम आणि भारताच्या बाजूने निकाल दिला.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
◾️ ‘हैदराबाद फंड’ प्रकरण या नावाने लंडनच्या न्यायालयात प्रसिद्ध असलेल्या या वादग्रस्त खटल्याचा निकाल गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात भारताच्या बाजूने लागला होता.
◾️यामुळे बँकेत अडकलेले ३२४ कोटी रुपये ब्रिटनमधील भारताच्या उच्चायुक्तांकडे जमा करण्यात आले आहेत.
◾️तत्कालीन हैदराबाद संस्थानच्या निजामाच्या संपत्तीचा भारत व पाकिस्तानमध्ये गेल्या सात दशकांपासून सुरू होता.
◾️त्यानुसार ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयाकडे ३२४ कोटी रुपये गुरुवारी (ता. १३) जमा करण्यात आले आहेत.
◾️ लंडनमधील ‘नेटवेस्ट’ बँकेत २० सप्टेंबर १९४८ पासून हे पैसे पडून होते. या संपत्तीवर पाकिस्ताने केलेला दावा न्यायालयाने फेटाळून तर लावलाच शिवाय न्यायालयीन खर्चाचा ६५ टक्के वाटा भारताला देण्याचा आदेश दिला होता.
◾️. फाळणीनंतर निजाम मीर उस्मान अली खान यांचे अर्थमंत्री मोईन नवाज जंग यांनी १९४८ मध्ये जवळपास ८ कोटी ८७ लाख रुपये एवढी रक्कम पाकिस्तानचे लंडनमधील तत्कालीन उच्चायुक्त एच. आय. रहीमतुला यांच्या नावे लंडनमधील ‘नॅशनल वेस्टमिन्स्टर बँके’त हस्तांतर केली होती.
◾️ही रक्कम आता ३२४ कोटी रुपये झाली आहे. तसेच ही बँकही ‘रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड’ या नावाने परिचित आहे.
◾️ पैशाच्या या व्यवहाराबाबत निजामाला अंधारात ठेवण्यात आले होते.
◾️उस्मान अली खान हे त्यावेळचे जगातील सर्वांत श्रीमंती व्यक्ती होते. त्यांचे निधन १९६७ मध्ये झाले.
◾️त्यांचे वंशज व आठवे निजाम मुकर्रम जहाँ आणि त्यांचे कनिष्ठ बंधू मुफ्फखम जहाँ हे पाकिस्तानच्या विरोधात हा खटला लढत होते.
◾️ लंडन न्यायालयाचे न्यायाधीश मार्कस स्मिथ यांनी निजाम आणि भारताच्या बाजूने निकाल दिला.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖