Репост из: 🏹आदित्य अकॅडमी🏹
थोडेसे ब्रेनवॉशिंग
(टीप:- सध्याच्या राजकीय वॉशिंगशी संबंध नाही)
MPSC निकाल लागल्यानंतर आपणांस सतत काही वर्षे अपयश आलेले असेल तर...
१ले वर्ष:- मान्य करा की आपला अभ्यास कमी पडला आहे.झालेल्या चुकांपासून शिका.
२रे वर्ष:- प्रश्नपत्रिका विश्लेषण व काटेकोरपणे अभ्यासाचे नियोजन करा.
३रे वर्ष:- पुढे अभ्यास करायचा की नाही हे ठरविण्याचे निर्णायक वर्ष.
४थेवर्ष:- प्लान बी वर काम करत जर वेळ मिळालाच तरच अभ्यास करा.
५वे वर्ष:- मागे फिरा, हे क्षेत्र आपल्यासाठी नाही हे स्वत:ला पटवून द्या.
आपला निर्णय स्वत: घ्या, कोणाचाही सल्ला ऐकू नका.अभ्यास कधीपासून सुरु करायचा? कोणती पोस्ट हवी? हे जर आपल्याला कळते तर आता बस्स झाले, इथे आपले काही खरे नाही, हा अभ्यास सोडून दुसरे काही काम करायला हवे हे MPSC चा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला कळायला हवे. जर त्याला हे कळत नसेल तर याचा साधा अर्थ आहे, आजवर त्याने अभ्यास केलाच नाही केला तर तो फक्त टाईमपास.
आजच्या तरुणांना सुशिक्षित बेरोजगार म्हणून आपली गणती होण्यापेक्षा MPSCचा अभ्यास करत आहे हे सांगणे भूषणावह वाटते.याला थोड्याफार प्रमाणात खाजगी क्षेत्रातील पिळवणूक व कमी पगाराच्या नोकऱ्या, इंग्रजीचे स्तोम, दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्याची लाज,व्यवसाय-धंद्याला अगदी घरातूनच होणारा पहिला विरोध,७वा वेतन आयोग,लग्नाच्या बाजारात सरकारी नोकरीची मक्तेदारी आणि आई-वडिलांचे कोडकौतुक जबाबदार आहे.
३०-३५ वर्षांचे घोडे होईपर्यंत कोणतेही अर्थाजन न करता वर तोंड करुन, "मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहे." हे सांगायला जराही लाज वाटत नाही? बेरोजगारी वाढली,मंदी आली यांचे आकडे पाठ करता करता याला मी पण जबाबदार आहे हे कधी कळणार आहे आपल्याला?
यात आई वडिलांची जबाबदारी मला मोठी वाटते. आपल्या मुलांना नक्कीच तुम्ही मोठे अधिकारी बनवा.पण त्यांना कामाची व अर्थाजनाची शिस्त लावा. ज्याच्या हाताला घट्टा व चट्टा नाही तो स्वावलंबी विद्यार्थी नाही” असे भाऊराव म्हणत असत.
एक वाक्य कदाचित तुम्हांला पचविणे अवघड ठरेल पण वस्तुस्थिति आहे, "सर्वच अधिकारी झाले तर झाड़ू कोण मारणार?"
दीपक गायकवाड
- आदित्य अकॅडमी
- अखंड महाराष्ट्र विद्यार्थी चळवळ
(टीप:- सध्याच्या राजकीय वॉशिंगशी संबंध नाही)
MPSC निकाल लागल्यानंतर आपणांस सतत काही वर्षे अपयश आलेले असेल तर...
१ले वर्ष:- मान्य करा की आपला अभ्यास कमी पडला आहे.झालेल्या चुकांपासून शिका.
२रे वर्ष:- प्रश्नपत्रिका विश्लेषण व काटेकोरपणे अभ्यासाचे नियोजन करा.
३रे वर्ष:- पुढे अभ्यास करायचा की नाही हे ठरविण्याचे निर्णायक वर्ष.
४थेवर्ष:- प्लान बी वर काम करत जर वेळ मिळालाच तरच अभ्यास करा.
५वे वर्ष:- मागे फिरा, हे क्षेत्र आपल्यासाठी नाही हे स्वत:ला पटवून द्या.
आपला निर्णय स्वत: घ्या, कोणाचाही सल्ला ऐकू नका.अभ्यास कधीपासून सुरु करायचा? कोणती पोस्ट हवी? हे जर आपल्याला कळते तर आता बस्स झाले, इथे आपले काही खरे नाही, हा अभ्यास सोडून दुसरे काही काम करायला हवे हे MPSC चा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला कळायला हवे. जर त्याला हे कळत नसेल तर याचा साधा अर्थ आहे, आजवर त्याने अभ्यास केलाच नाही केला तर तो फक्त टाईमपास.
आजच्या तरुणांना सुशिक्षित बेरोजगार म्हणून आपली गणती होण्यापेक्षा MPSCचा अभ्यास करत आहे हे सांगणे भूषणावह वाटते.याला थोड्याफार प्रमाणात खाजगी क्षेत्रातील पिळवणूक व कमी पगाराच्या नोकऱ्या, इंग्रजीचे स्तोम, दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्याची लाज,व्यवसाय-धंद्याला अगदी घरातूनच होणारा पहिला विरोध,७वा वेतन आयोग,लग्नाच्या बाजारात सरकारी नोकरीची मक्तेदारी आणि आई-वडिलांचे कोडकौतुक जबाबदार आहे.
३०-३५ वर्षांचे घोडे होईपर्यंत कोणतेही अर्थाजन न करता वर तोंड करुन, "मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहे." हे सांगायला जराही लाज वाटत नाही? बेरोजगारी वाढली,मंदी आली यांचे आकडे पाठ करता करता याला मी पण जबाबदार आहे हे कधी कळणार आहे आपल्याला?
यात आई वडिलांची जबाबदारी मला मोठी वाटते. आपल्या मुलांना नक्कीच तुम्ही मोठे अधिकारी बनवा.पण त्यांना कामाची व अर्थाजनाची शिस्त लावा. ज्याच्या हाताला घट्टा व चट्टा नाही तो स्वावलंबी विद्यार्थी नाही” असे भाऊराव म्हणत असत.
एक वाक्य कदाचित तुम्हांला पचविणे अवघड ठरेल पण वस्तुस्थिति आहे, "सर्वच अधिकारी झाले तर झाड़ू कोण मारणार?"
दीपक गायकवाड
- आदित्य अकॅडमी
- अखंड महाराष्ट्र विद्यार्थी चळवळ