Репост из: MPSC मित्र
‘महामारी कायदा-1897’ लागू करण्याविषयी राज्यांना सूचना
- COVID-19 विषाणूचा प्रसार थांबावा यासाठी उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना ‘महामारी कायदा-1897’ याच्या कलम 2 मधील तरतुदींना लागू करण्याविषयी सूचना केली आहे.
- या तरतुदींमुळे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय किंवा राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकार यांच्याकडून वेळोवेळी येणाऱ्या सर्व सुचनांची सक्तीने अंमलबजावणी करण्यात येते. तसेच धोकादायक साथीच्या रोगांच्या विरूद्ध विशेष उपाययोजना करण्याचे आणि नियम आखण्याची शक्ती प्रदान करते. यामुळे लोकांच्या हितासाठी सरकारला रोगाचा प्रसार रोखण्यासाठी कोणत्याही आवश्यक (सक्तीच्या) पद्धतीचा अवलंब करण्यास ताकद मिळते.
- या तरतुदींमुळे रेल्वेने किंवा इतर मार्गाने प्रवास करणाऱ्या कोणत्याही व्यक्तींची तपासणी करण्याचे अधिकार तसेच संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या व्यक्तीला लोकांपासून वेगळे करणे, रुग्णालयात, तात्पुरत्या निवासस्थानात स्थलांतरित करणे अश्या सक्तीच्या उपाययोजना करण्याचे अधिकार देखील सरकारला देते.
▪️ पार्श्वभूमी
- 11 मार्च 2020 रोजी जागतिक आरोग्य संघटनेनी COVID-19 विषाणू ‘महामारी’ म्हणून घोषित केले. आतापर्यंत भारतातल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येनी 70 हा आकडा पार केला आहे. तर जगभरात याचे 1 लक्षाहून अधिक रुग्ण आढळले आहेत.
- ‘महामारी रोग कायदा-1897’ पहिल्यांदा पूर्वीच्या बॉम्बे राज्यात ब्यूबोनिक प्लेगच्या वेळी लागू करण्यात आला होता.
Join. @MegaBharati
- COVID-19 विषाणूचा प्रसार थांबावा यासाठी उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना ‘महामारी कायदा-1897’ याच्या कलम 2 मधील तरतुदींना लागू करण्याविषयी सूचना केली आहे.
- या तरतुदींमुळे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय किंवा राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकार यांच्याकडून वेळोवेळी येणाऱ्या सर्व सुचनांची सक्तीने अंमलबजावणी करण्यात येते. तसेच धोकादायक साथीच्या रोगांच्या विरूद्ध विशेष उपाययोजना करण्याचे आणि नियम आखण्याची शक्ती प्रदान करते. यामुळे लोकांच्या हितासाठी सरकारला रोगाचा प्रसार रोखण्यासाठी कोणत्याही आवश्यक (सक्तीच्या) पद्धतीचा अवलंब करण्यास ताकद मिळते.
- या तरतुदींमुळे रेल्वेने किंवा इतर मार्गाने प्रवास करणाऱ्या कोणत्याही व्यक्तींची तपासणी करण्याचे अधिकार तसेच संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या व्यक्तीला लोकांपासून वेगळे करणे, रुग्णालयात, तात्पुरत्या निवासस्थानात स्थलांतरित करणे अश्या सक्तीच्या उपाययोजना करण्याचे अधिकार देखील सरकारला देते.
▪️ पार्श्वभूमी
- 11 मार्च 2020 रोजी जागतिक आरोग्य संघटनेनी COVID-19 विषाणू ‘महामारी’ म्हणून घोषित केले. आतापर्यंत भारतातल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येनी 70 हा आकडा पार केला आहे. तर जगभरात याचे 1 लक्षाहून अधिक रुग्ण आढळले आहेत.
- ‘महामारी रोग कायदा-1897’ पहिल्यांदा पूर्वीच्या बॉम्बे राज्यात ब्यूबोनिक प्लेगच्या वेळी लागू करण्यात आला होता.
Join. @MegaBharati