*🔥 ऑक्टोबर हिट*🔥
*■ ऑक्टोबर हिटला संक्रमण काळ का म्हणतात ?*
*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*
देशात नैर्ऋत्य मोसमी वार्यांचा परतीचा प्रवास सुरू आहे. सर्वत्र नवचैतन्य भरणार्या पावसाळ्यानंतर ऑक्टोबर हिटला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दिवसभर रखरखते ऊन अन कोंदट वातावरणामुळे उन्हाळ्याची सुरुवात झाल्यासारखी वाटते. उच्च तापमान आणि वातावरणातील आर्द्रता, यालाच ऑक्टोबर हिट म्हणतात. पावसाळाच्या शेवटी ही विशिष्ट हवामान दर्शविणारी घटना घडते; विशेषतः भारतासारख्या उष्ण कटिबंधीय प्रदेशात. हे वातावरण आरोग्यासाठी अधिक धोकादायक मानले जाते; ज्यात उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. ऑक्टोबर हिट म्हणजे नक्की काय? याचा आरोग्यावर कसा परिणाम होऊ शकतो? सुरक्षित राहण्यासाठी काय करावे? याबाबत माहिती जाणून घेऊया.
*ऑक्टोबर हिट कशामुळे होते?*
ऑक्टोबर हिट मध्ये पावसाळ्यानंतर तापमानात असामान्य वाढ होते; ज्यामुळे उत्तर भारत, महाराष्ट्र व गुजरात यांसारख्या भागांवर परिणाम होतो. याकाळात एक अस्वस्थ वातावरण निर्माण होते, जे कोरड्या उन्हाळ्याच्या उष्णतेपेक्षा वेगळे असते. सामान्यतः, नैर्ऋत्य मोसमी वारे थंडावा वाढवतात, परंतु जसजसे हे वारे कमी होत जातात, तसतसे तापमान अनियंत्रित होऊ लागते. या वाऱ्यांच्या कमकुवतपणामुळे तापमान वाढते आणि वातावरणात दीर्घकाळ आर्द्रता राहते, विशेषत: मुंबई सारख्या किनारपट्टीवरील शहरांमध्ये. समुद्रकिनार्यावरील शहरांना या वातावरणाचा धोका अधिक असतो. काँक्रीट आणि डांबर दिवसा उष्णता शोषून घेतात आणि हळूहळू ती सोडतात; ज्यामुळे मुंबई सारखे मेट्रो शहर आसपासच्या ग्रामीण भागांपेक्षा जास्त उष्ण राहते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात शहरातील तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान वाढते.
*आरोग्यावर होणार परिणाम*
ऑक्टोबर हिटचा शरीराला थंड ठेवण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो; ज्यामुळे डिहायड्रेशन, डोकेदुखी, चक्कर येणे आणि श्वासोच्छवासाच्या समस्यांसह अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. उच्च आर्द्रतेमुळे शरीराचे तापमान नियंत्रित करणे कठीण होऊन दम्यासारखे आजार उद्भवण्याची भीती वाढते. वाढत्या तापमानामुळे रोगप्रतिकार शक्ती देखील कमकुवत होऊ शकते; ज्यामुळे सर्दी सारखे विषाणूजन्य संसर्ग होऊ शकतात. तसेच तुलनेने उष्ण परिस्थितीच्या जास्त संपर्कात येण्यामुळे शरीराचे तापमान बदलते आणि थकवा व उष्माघात यांसारखे आजार संभवतात. दमट हवामानामुळे जीवाणू आणि विषाणूंचा प्रसार वाढतो; ज्यामुळे त्वचेच्या संसर्गाचा धोका वाढतो.
*सुरक्षित कसे राहावे?*
ऑक्टोबर हिटचे दुष्परिणाम टाळण्यासाठी, कमाल उष्ण तापमानावेळी घरात राहणे महत्त्वाचे आहे. विशेषत: सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान बाहेर जाणे टाळण्याचा प्रयत्न करावा. पंखे किंवा वातानुकूलन यंत्रणेचा वापर करून घरातील वातावरण थंड ठेवावे. अशा वातावरणात दिवसभर भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. त्याच वेळी अल्कोहोलयुक्त पेय घेणे टाळावे. कोशिंबीर आणि फळे यांसारखे पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. आहारात थंड पदार्थांचा समावेश करणे आणि आहार संतुलित करणे आवश्यक आहे. जीवनसत्त्वे व खनिजे यांचा उत्कृष्ट स्रोत असणारी फळे आणि भाज्या यांचा आहारात समावेश करावा. शरीराचे तापमान कमी करण्यासाठी थंड पाण्याने आंघोळ किंवा स्पंज बाथ देखील घेता येतो आणि थंड राहण्यासाठी हलक्या रंगाचे व सैलसर कपडे परिधान करणेही फायद्याचे ठरू शकते.
*सौजन्य : दैनिक लोकसत्ता*
*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*
🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺
*■ ऑक्टोबर हिटला संक्रमण काळ का म्हणतात ?*
*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*
देशात नैर्ऋत्य मोसमी वार्यांचा परतीचा प्रवास सुरू आहे. सर्वत्र नवचैतन्य भरणार्या पावसाळ्यानंतर ऑक्टोबर हिटला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दिवसभर रखरखते ऊन अन कोंदट वातावरणामुळे उन्हाळ्याची सुरुवात झाल्यासारखी वाटते. उच्च तापमान आणि वातावरणातील आर्द्रता, यालाच ऑक्टोबर हिट म्हणतात. पावसाळाच्या शेवटी ही विशिष्ट हवामान दर्शविणारी घटना घडते; विशेषतः भारतासारख्या उष्ण कटिबंधीय प्रदेशात. हे वातावरण आरोग्यासाठी अधिक धोकादायक मानले जाते; ज्यात उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. ऑक्टोबर हिट म्हणजे नक्की काय? याचा आरोग्यावर कसा परिणाम होऊ शकतो? सुरक्षित राहण्यासाठी काय करावे? याबाबत माहिती जाणून घेऊया.
*ऑक्टोबर हिट कशामुळे होते?*
ऑक्टोबर हिट मध्ये पावसाळ्यानंतर तापमानात असामान्य वाढ होते; ज्यामुळे उत्तर भारत, महाराष्ट्र व गुजरात यांसारख्या भागांवर परिणाम होतो. याकाळात एक अस्वस्थ वातावरण निर्माण होते, जे कोरड्या उन्हाळ्याच्या उष्णतेपेक्षा वेगळे असते. सामान्यतः, नैर्ऋत्य मोसमी वारे थंडावा वाढवतात, परंतु जसजसे हे वारे कमी होत जातात, तसतसे तापमान अनियंत्रित होऊ लागते. या वाऱ्यांच्या कमकुवतपणामुळे तापमान वाढते आणि वातावरणात दीर्घकाळ आर्द्रता राहते, विशेषत: मुंबई सारख्या किनारपट्टीवरील शहरांमध्ये. समुद्रकिनार्यावरील शहरांना या वातावरणाचा धोका अधिक असतो. काँक्रीट आणि डांबर दिवसा उष्णता शोषून घेतात आणि हळूहळू ती सोडतात; ज्यामुळे मुंबई सारखे मेट्रो शहर आसपासच्या ग्रामीण भागांपेक्षा जास्त उष्ण राहते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात शहरातील तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान वाढते.
*आरोग्यावर होणार परिणाम*
ऑक्टोबर हिटचा शरीराला थंड ठेवण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो; ज्यामुळे डिहायड्रेशन, डोकेदुखी, चक्कर येणे आणि श्वासोच्छवासाच्या समस्यांसह अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. उच्च आर्द्रतेमुळे शरीराचे तापमान नियंत्रित करणे कठीण होऊन दम्यासारखे आजार उद्भवण्याची भीती वाढते. वाढत्या तापमानामुळे रोगप्रतिकार शक्ती देखील कमकुवत होऊ शकते; ज्यामुळे सर्दी सारखे विषाणूजन्य संसर्ग होऊ शकतात. तसेच तुलनेने उष्ण परिस्थितीच्या जास्त संपर्कात येण्यामुळे शरीराचे तापमान बदलते आणि थकवा व उष्माघात यांसारखे आजार संभवतात. दमट हवामानामुळे जीवाणू आणि विषाणूंचा प्रसार वाढतो; ज्यामुळे त्वचेच्या संसर्गाचा धोका वाढतो.
*सुरक्षित कसे राहावे?*
ऑक्टोबर हिटचे दुष्परिणाम टाळण्यासाठी, कमाल उष्ण तापमानावेळी घरात राहणे महत्त्वाचे आहे. विशेषत: सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान बाहेर जाणे टाळण्याचा प्रयत्न करावा. पंखे किंवा वातानुकूलन यंत्रणेचा वापर करून घरातील वातावरण थंड ठेवावे. अशा वातावरणात दिवसभर भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. त्याच वेळी अल्कोहोलयुक्त पेय घेणे टाळावे. कोशिंबीर आणि फळे यांसारखे पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. आहारात थंड पदार्थांचा समावेश करणे आणि आहार संतुलित करणे आवश्यक आहे. जीवनसत्त्वे व खनिजे यांचा उत्कृष्ट स्रोत असणारी फळे आणि भाज्या यांचा आहारात समावेश करावा. शरीराचे तापमान कमी करण्यासाठी थंड पाण्याने आंघोळ किंवा स्पंज बाथ देखील घेता येतो आणि थंड राहण्यासाठी हलक्या रंगाचे व सैलसर कपडे परिधान करणेही फायद्याचे ठरू शकते.
*सौजन्य : दैनिक लोकसत्ता*
*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*
🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺