Noma’lum dan repost
Ayodhya Ram Mandir : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी १५ जोडप्यांना मिळाला बहुमान, महाराष्ट्रातील दोन जोडप्यांचाही समावेश; मुख्य यजमानपद कोणाला?
Ram Mandir Ayodhya : श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने शनिवारी १४ नावांची यादी जाहीर केली. तर, एका जोडप्याचं नाव नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
Ayodhya Ram Mandir Inauguration : बहुप्रतिक्षित भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली आहे. यानिमित्ताने अयोध्या नगरीसह देशभरातील अनेक महत्त्वाची शहरे, ग्रामीण भाग सजले आहेत. ठिकठिकाणी दिवाळीचा जल्लोष सुरू झाला आहे. निमंत्रित अयोध्येत दाखल होत असून अयोध्येमध्ये तयारीवर अखेरचा हात फिरवला जात आहे. श्री रामाच्या मूर्तीसाठी खास पोषाख तयार झाला आहे. दरम्यान, या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी भारतभरातून १५ जोडप्यांची यजमान म्हणून निवड करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे, या जोडप्यांमध्ये दलित, आदिवासी, ओबीसीसह इतर जातींचा समावेश आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने शनिवारी १४ नावांची यादी जाहीर केली. तर, एका जोडप्याचं नाव नंतर जाहीर करण्यात येणार आहे. यजमान म्हणून ही जोडपी राम मंदिर अभिषेक सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएस प्रमुख मोहन भागवत, ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत विधी पार पाडणार आहेत.
१४ नावांच्या यादीत आरएसएसशी संलग्न वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष रामचंद्र खराडी यांचा समावेश आहे. आदिवासी समाजातून असलेले खराडी हे उदयपूरचे आहेत. तीन यजमान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसी येथील आहेत. त्यात काशीचा डोम राजा अनिल चौधरी यांचा समावेश आहे. वाराणसीतील मणिकर्णिका आणि हरिशचंद्र घाटांवर ज्योत प्रज्वलित करण्याची जबाबदारी पिढ्यानपिढ्या डोम्सची आहे. ते स्वतःला पौराणिक राजा काळू डोमच्या वारशाचे वारसदार असल्याचा दावा देखील करतात. तर, वाराणसीतून कैलाश यादव आणि कवींद्र प्रताप सिंग यांचीही निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातून दोघांना मिळाला बहुमान
आसामचे राम कुई जेमी, सरदार गुरू चरणसिंग गिल (जयपूर), कृष्ण मोहन (हरदोई, रविदासी समाजातील), रमेश जैन (मुलतानी), अदलरासन (तामिळनाडू), विठ्ठलराव कांबळे (मुंबई), महादेव राव गायकवाड (लातूर, घुमंटू समाज विश्वस्त), लिंगराज वसवराज आप्पा (कर्नाटकमधील कलबुर्गी), दिलीप वाल्मिकी ( लखनौ ), आणि अरुण चौधरी (हरियाणातील पलवल) यांनाही खास यजमानपद देण्यात आले आहे.
RSS नेते आणि अवध विंगचे सदस्य अनिल मिश्रा आणि पत्नी उषा या मुख्य यजमानपद देण्यात आलं आहे. हे जोडपं अभिषेक कार्यक्रमापर्यंत नेणारे विधी पार पाडतील. मिश्रा हे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या १५ विश्वस्तांपैकी एक आहेत.
Ram Mandir Ayodhya : श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने शनिवारी १४ नावांची यादी जाहीर केली. तर, एका जोडप्याचं नाव नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
Ayodhya Ram Mandir Inauguration : बहुप्रतिक्षित भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली आहे. यानिमित्ताने अयोध्या नगरीसह देशभरातील अनेक महत्त्वाची शहरे, ग्रामीण भाग सजले आहेत. ठिकठिकाणी दिवाळीचा जल्लोष सुरू झाला आहे. निमंत्रित अयोध्येत दाखल होत असून अयोध्येमध्ये तयारीवर अखेरचा हात फिरवला जात आहे. श्री रामाच्या मूर्तीसाठी खास पोषाख तयार झाला आहे. दरम्यान, या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी भारतभरातून १५ जोडप्यांची यजमान म्हणून निवड करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे, या जोडप्यांमध्ये दलित, आदिवासी, ओबीसीसह इतर जातींचा समावेश आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने शनिवारी १४ नावांची यादी जाहीर केली. तर, एका जोडप्याचं नाव नंतर जाहीर करण्यात येणार आहे. यजमान म्हणून ही जोडपी राम मंदिर अभिषेक सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएस प्रमुख मोहन भागवत, ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत विधी पार पाडणार आहेत.
१४ नावांच्या यादीत आरएसएसशी संलग्न वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष रामचंद्र खराडी यांचा समावेश आहे. आदिवासी समाजातून असलेले खराडी हे उदयपूरचे आहेत. तीन यजमान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसी येथील आहेत. त्यात काशीचा डोम राजा अनिल चौधरी यांचा समावेश आहे. वाराणसीतील मणिकर्णिका आणि हरिशचंद्र घाटांवर ज्योत प्रज्वलित करण्याची जबाबदारी पिढ्यानपिढ्या डोम्सची आहे. ते स्वतःला पौराणिक राजा काळू डोमच्या वारशाचे वारसदार असल्याचा दावा देखील करतात. तर, वाराणसीतून कैलाश यादव आणि कवींद्र प्रताप सिंग यांचीही निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातून दोघांना मिळाला बहुमान
आसामचे राम कुई जेमी, सरदार गुरू चरणसिंग गिल (जयपूर), कृष्ण मोहन (हरदोई, रविदासी समाजातील), रमेश जैन (मुलतानी), अदलरासन (तामिळनाडू), विठ्ठलराव कांबळे (मुंबई), महादेव राव गायकवाड (लातूर, घुमंटू समाज विश्वस्त), लिंगराज वसवराज आप्पा (कर्नाटकमधील कलबुर्गी), दिलीप वाल्मिकी ( लखनौ ), आणि अरुण चौधरी (हरियाणातील पलवल) यांनाही खास यजमानपद देण्यात आले आहे.
RSS नेते आणि अवध विंगचे सदस्य अनिल मिश्रा आणि पत्नी उषा या मुख्य यजमानपद देण्यात आलं आहे. हे जोडपं अभिषेक कार्यक्रमापर्यंत नेणारे विधी पार पाडतील. मिश्रा हे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या १५ विश्वस्तांपैकी एक आहेत.